राहुरी(वेबटीम) स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तीच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात देवून सेनापती केले. चिन्ह व शिवसेना न...
राहुरी(वेबटीम)
स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तीच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात देवून सेनापती केले. चिन्ह व शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेचा वापर करुन व कायद्याच्या खेळी करुन पळविले असले तरी सर्वसामान्य जनतेला आज हि शिवसेना हि ठाकरे यांचीच आहे हे माहित असल्याने राहुरी तालुक्यासह ग्रामिण भागातील जनता आजही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचे शिवसैनिक अशोकराव तुपे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथिल शिवसैनिक अशोकराव तुपे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रात सध्या गलीच्छ राजकारण सुरु आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सत्तेचा गैरवापर करुन भाजपाच्या आधाराने कायद्याची खेळी करुन ठाकरे गटाकडून शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह हिसकावून घेतले आहे.शिवसेना प्रमुख पदावरुन उद्धव ठाकरे यांना हटवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसायचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अशा लोकांवर जो विश्वात ठेवला त्याच लोकांनी उद्धव ठाकरे यांचा घात केला आहे.
शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण शिंदे गटाने पळविले असले तरी ग्रामिण भागातील जनता आजही ठाकरे गटाची शिवसेना समजते.शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता निवडणूकीला सामोरे जावे तेव्हा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. ग्रामिण भागातील जनता आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असुन उद्धव ठाकरेच सरसेनापती राहतील असे तुपे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत