राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते यांची व्हा.चेअरमन पदी आबासाहेब वाळुंज यांची...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते यांची व्हा.चेअरमन पदी आबासाहेब वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड प्रकिया बिनविरोध पार पडली असता आज सकाळी संस्थेच्या सभागृहात चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी निवड प्रकिया पार पडली.
यावेळी चेअरमन पदासाठी यांची विष्णुपंत गीते तर व्हा.चेअरमनपदी आबासाहेब वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक व विद्यमान संचालक शिवाजीराव कपाळे,अविनाश साबरे,पल्लवी सोनी,कमला काळे ,मारुती खरात यांच्यासह शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,प्रकाश सोनी,प्रशांत काळे,हर्षद ताथेड, सुनील विश्वासराव, दत्तात्रय साळुंके, रंगनाथ घाडगे, दत्तात्रय दरंदले, ऋषभ लोढा, रमेश चोरडिया, शेखर शिंदे, किशोर थोरात, किशोर कोबरणे, दिलीप गागरे, भगवान काकड सर, काशीनाथ मोरे, शरद वाळुंज,पारस नहार,संभाजी देठे, संतोष झावरे, स्वराज गीते, संगीता कपाळे, उमाताई गीते, निकिता गीते,जगन्नाथ बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहाय्यक निंबधक कार्यालयातील एम.ए.शेख यांनी काम पाहिले तर त्यांना मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सहाय्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत