देवळाली प्रवरा(वेबटीम) डॉ.बाबासाहेंबांनी सर्वच श्रेत्रात दिलेल्या अमाप योगदानामुळे आज भारताची लोकशाही येथील वंचित समाज सशक्त झाला आहे.त्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
डॉ.बाबासाहेंबांनी सर्वच श्रेत्रात दिलेल्या अमाप योगदानामुळे आज भारताची लोकशाही येथील वंचित समाज सशक्त झाला आहे.त्यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा या मुलमंत्रावर आजची तरुणाई चालली तरच या देशाला भवितव्य असल्याचे प्रतीपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
आज देवळाली प्रवरा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वतीने आराध्या व्यापारी संकुलात आयोजित डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात मुख्याधिकारी अजित निकत ,पत्रकार रफिक शेख , कॅा. मदिना शेख,प्रा सतीश राऊत,श्री खरात यांनी विचार मांडले.
यावेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक चंद्रकांत दोंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन दत्ता कडु यांनी केले. शहरप्रमुख अनिल चव्हाण यांचे संकल्पनेतुन हा कार्यक्रम साकार झाला.
या कार्यक्रमास म्हाडाचे माजी अध्यक्ष व एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे,शिवसेना नेते अशोक थोरे, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, कॅा शरद संसारे , रामभाऊ काळे, सुनील विश्वासराव,राष्ट्रवादी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण , वैभव गिरमे ,विजय कुमावत , युवासेना अध्यक्ष युवा सेनाप्रमुख मनीष देठे, बाबा टेलर तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थितीत होते.
कोणताहि अनावश्यक खर्च न करता विधायक कामांत योगदान देत डॅा आंबेडकर जयंती अंत्यत साध्या पध्दतीने साजरी केली याबद्दल शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे देवळाली प्रवरा येथील पदाधिका-यांचे नागरिक कौतुक करताना दिसुन आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत